राज्यातील डी. एड. उमेदवारांच्या नोकरीच्या आशा पुन्हा पल्लवित
पुढील महिन्यात होणार चाचणी : पात्र ठरलेल्यांची नियुक्ती बंधनकारक
पुणे - राज्यातील शिक्षकांची भरती "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी'मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शिक्षण संस्थांनी शिक्षक नियुक्ती बंधनकारक आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही चाचणी येत्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. त्यामुळे बेरोजगार डी.एड. उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांची भरती या चाचणीद्वारे होणार आहे.
त्याचे उल्लंघन करून भरती झाल्यास संबंधित शिक्षण संस्था, शाळेला अनुदान दिले जाणार नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीतील संस्थेच्या अधिकारांना शासनाने लगाम लावले आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. 23 जून 2017 रोजी जारी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असलेला उमेदवारच अभियोग्यता चाचणीसाठी पात्र राहणार आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
"अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे. त्याचप्रमाणे खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना संबंधित संस्थेला शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या "पवित्र' (पोर्टल फॉर व्हिजीबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट) या संगणकीय प्रणालीवरील अभियोग्यता चाचणीमधील पात्र उमेदवार उपलब्ध केले जाणार आहे. त्यातील पात्र उमेदवार गुणांसह अर्ज करतील. त्यानंतर पाच दिवसांच्या आत संबंधित शिक्षण संस्था गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवडसूची जाहीर करेल. निवडसुचीतील उच्चतम गुणप्राप्त संबंधित उमेदवारांना ई-मेलद्वारे तसेच पोस्टाद्वारे नियुक्ती पत्र पाठविण्यात येणार आहे, अशी ही निवडप्रक्रिया राहणार आहे.
"डोनेशन' न देता नोकरी
ही चाचणी ऑनलाइन होत असून, त्यात उत्तीर्ण व अनुत्तीर्ण परीक्षा संपताच लगेच कळणार आहे. यातील पात्र उमेदवारांची यादी "पवित्र' या संगणकीय प्रणालीवर प्रसिद्ध केले जाणार आहे. या यादीतील उमेदवारांच शिक्षण संस्थांनी शिक्षक भरती करणे अनिवार्य आहे. त्यामुळे गुणवंत उमेदवारांना कोणत्याही "डोनेशन' न देता नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. यात शिक्षण संस्थांच्या गैरप्रकाराला पायबंद बसणार असल्याने ही परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांत घेण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार ही परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दिवाळीनंतर जाहीर केले जातील.
- सुरेश माळी, उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुढील महिन्यात होणार चाचणी : पात्र ठरलेल्यांची नियुक्ती बंधनकारक
पुणे - राज्यातील शिक्षकांची भरती "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी'मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शिक्षण संस्थांनी शिक्षक नियुक्ती बंधनकारक आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही चाचणी येत्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. त्यामुळे बेरोजगार डी.एड. उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांची भरती या चाचणीद्वारे होणार आहे.
त्याचे उल्लंघन करून भरती झाल्यास संबंधित शिक्षण संस्था, शाळेला अनुदान दिले जाणार नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीतील संस्थेच्या अधिकारांना शासनाने लगाम लावले आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. 23 जून 2017 रोजी जारी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असलेला उमेदवारच अभियोग्यता चाचणीसाठी पात्र राहणार आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
"अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे. त्याचप्रमाणे खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना संबंधित संस्थेला शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या "पवित्र' (पोर्टल फॉर व्हिजीबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट) या संगणकीय प्रणालीवरील अभियोग्यता चाचणीमधील पात्र उमेदवार उपलब्ध केले जाणार आहे. त्यातील पात्र उमेदवार गुणांसह अर्ज करतील. त्यानंतर पाच दिवसांच्या आत संबंधित शिक्षण संस्था गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवडसूची जाहीर करेल. निवडसुचीतील उच्चतम गुणप्राप्त संबंधित उमेदवारांना ई-मेलद्वारे तसेच पोस्टाद्वारे नियुक्ती पत्र पाठविण्यात येणार आहे, अशी ही निवडप्रक्रिया राहणार आहे.
"डोनेशन' न देता नोकरी
ही चाचणी ऑनलाइन होत असून, त्यात उत्तीर्ण व अनुत्तीर्ण परीक्षा संपताच लगेच कळणार आहे. यातील पात्र उमेदवारांची यादी "पवित्र' या संगणकीय प्रणालीवर प्रसिद्ध केले जाणार आहे. या यादीतील उमेदवारांच शिक्षण संस्थांनी शिक्षक भरती करणे अनिवार्य आहे. त्यामुळे गुणवंत उमेदवारांना कोणत्याही "डोनेशन' न देता नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. यात शिक्षण संस्थांच्या गैरप्रकाराला पायबंद बसणार असल्याने ही परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांत घेण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार ही परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दिवाळीनंतर जाहीर केले जातील.
- सुरेश माळी, उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

Good informational blog sir
ReplyDelete